सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडका विशेष सभेत अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी प्नविण माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.यावेळी जि. प. सदस्य सूभाष सातपूते, कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी संचालक सिताराम  पाटील, माजी सरपंच  सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे, कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष रघूनाथ दिंडे, तंटामूक्त अध्यक्ष मारूतराव  दिंडे, आनंदराव दिंडे, ग्रामसेवक आर. आर. भगत, संग्राम बचाटे आदी उपस्थित होते.