कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे येथील संदीप महादेव रावण (वय ३४) हा विवाहीत तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी दिपाली रावण यांनी कळे पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

याबाबत पोलीसातून मिळालेल्या माहिती अशी की, संदीप रावण हे शेती बरोबरच बांधकामाची कामे करीत होते. गुरुवार दि.१४ रोजी सकाळी सातच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता ते घरातून निघून गेले. त्यांनी जातेवेळी ‘दादा मला माफ कर, तुला उगाच माझ्यामुळे त्रास नको. मी घर सोडून गेलो. दादा तू तुझा विचार कर, बापू, आईची काळजी घे. मला शोध नकोसा. मी घर सोडून गेल्याने तुम्हाला त्रास होतोय. अशा आशयाची चिट्ठी राहत्या घरी सापडली आहे.’

रावण कुटुंबीयांनी त्यांची नातेवाईक आणि सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर कळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. कळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.