नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळाप्रकरकणी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.  सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.  

राज्यसभेच्या अधिवेशनाच्या ११ ऑगस्ट २०२१ च्या दिवशी झालेल्या मान्सून सत्राच्या वेळेस १२ विरोधी खासदारांनी सभागृहाची प्रतिमा मलिन होईल, अशी वर्तवणूक केली. त्यामुळे नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित खासदार खालीलप्रमाणे –  

एल्लामारम करीम (सीपीएम)

फुलो देव निताम (काँग्रेस)

छाया वर्मा (काँग्रेस)

रिपून बोरा (काँग्रेस)

बिनोय विश्मव (सीपीआय)

राजमणी पटेल (काँग्रेस)

डोला सेन (तृणमूल काँग्रेस)

शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)

सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस)

प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)

अनिल देसाई (शिवसेना)

अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)