मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं, असा टोला  माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेचा ‘शवसेना’ असाही उल्लेख केला आहे.

शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले, अशी टीका अमृता यांनी ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी,  महाराष्ट्र कुठे नेला असो, पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद, असं म्हणत बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत. अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करत आपलं हसं करुन घेतलं आहे, याबद्दल भाष्य केले आहे.