कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शहरातील संपूर्ण ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार २४ नोव्हेंबरला पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती जलअभियंता नारायण भोसले यांनी दिली. 

महाराष्ट राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून दुरुस्ती कामासाठी शिंगणापूर योजनेवरील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शिंगणापूर योजनेवर अवलंबून असणाऱ्या शहरातील संपूर्ण ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

शहरातील साळोखे नगर, कणेरकरनगर,बापुरावनगर, आयटीआय, कळंबाजेल, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क, सुभाषनगर, दादू चौगुलेनगर, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहरनगर, वायपीपोवारनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, टिंबरमार्केट, गंजीमाळ, वारेवसाहत, विजयनगर इत्यादी परिसर तसेच ई वॉर्डमधील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा संपूर्ण परिसर, त्यामध्ये सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, राजारामपुरी, शाहुमिल, उद्यमनगर, यादवनगर,राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहुपुरीतील काही भाग, पाचबंगला, साईक्स एक्स्टेंनशन, कावळानाका, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, सहयाद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजीपार्क, महाडीक वसाहत इत्यादी भागाचा समावेश आहे. या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, तसेच या कालावधीत बालिंगा, बावडा व कळंबा जलशुध्दीकरण केंद्राव्दारे पाणीपुरवठा नियमित होणार आहे.