अमरावती : व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या ही उदयपूर पॅटर्न प्रमाणेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानेच ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शी तपासात उघड झाल्याले तब्बल ११ दिवसांनी पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या हत्येचा तपास आता एनआयए करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. ही हत्या उदयपूरच्या पॅटर्नप्रमाणेच झाली असून, याला पोलीस आयुक्त आरती सिंह याच जबाबदार आहेत, असा आरोप करून आरती सिंह यांना पदावरुन तत्काळ हटवावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. हे पत्रही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवले आहे.