कोल्हापूर  (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्याजवळ  झालेल्या भरधाव कार  अपघातात कोल्हापुरातील दोन तरुण ठार झाले. तर एकजण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास झाला.

आदित्य प्रतापसिंह घाटगे (वय २३, वाडकर गल्ली, कसबा बावडा) व अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३, कदमवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  तर देवराज माळी (वय २१ ) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण लग्नासाठी पुण्याला  गेले होते. परत येताना साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायालयानजीक असलेल्या ओढ्यात  चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार साधारण ३० फूट खोल पडली. यात कारचा चक्काचूर झाला.  आदित्य कुलकर्णी अनिदा वडा सेंटर  चालवत होता.