कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये सुरु असणाऱ्या संततधार पावसाने आज विश्रांती घेतली असली तरी पुराचा धोका अजूनही कायम आहे. शहरातील एकूण ७५ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पातळी स्थिर आहे. राधानगरी धरणाचे आज (शुक्रवार) सकाळी स्वयंचलित तीन नंबरचा, तर दुपारी ४ नंबरचा दरवाजा बंद झाला आहे, तर ५, ६ व ७ हे तीन दरवाजे अजूनही उघडे आहेत. पाॅवर हाऊसमधून १६०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या तीन दरवाजातून ४२८४ क्युसेक विसर्ग होत आहे.