साळवण प्रतिनिधी : गगनबावडा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने साळवण या ठिकाणी हातामध्ये झेंडा घेऊन किरवेपासून ते निवडे-साळवण या ठिकाणापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. गगनबावडा तालुक्यात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ अशा अनेक घोषणा देत भर पावसात ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग पाटील, भगवान पाटील, पांडुरंग खाडे, संजय पडवळ, संभाजी पाटील, महादेव  पडवळ, सहदेव  कांबळे, पांडुरंग भोसले, शहाजी पाटील, प्रकाश  मेगांणे, पी. डी. जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.