मुंबई (प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध आणि मानाची समजल्या जाणाऱ्या  ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले असून याचा प्रिमियर ८ जुलै रोजी या महोत्सवात होणार आहे.

पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या मनातल्या उन्हात, ड्राय डे या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जाधव यांनी एका भावनिक कथेची मांडणी भारत माझा देश आहे या चित्रपटातून केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन निशांत धापसे यांनी केले आहे. तर शशांक शेंडे,मंगेश देसाई,छाया कदम,हेमांगी कवी,राजरवीसिंहराजे गायकवाड,देवांशी सामंत,नम्रता साळोखे यांनी या चित्रपटात भूमिका निभावली आहे.