जालना (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असली, तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. दुसरी आली तरी राज्य सरकार पूर्ण तयारीत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील, अशी माहितीही मंत्री टोपे यांनी दिली.

मंत्री टोपे म्हणाले की, युरोपीयन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देश आणि राज्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाती आहे. मात्र, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. त्याचबरोबर याआधी लग्नसमारंभात पन्नास लोकांना परवानगी दिली होती. त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील, असेही ते म्हणाले.