नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन गुणांची आकडेवारी प्रसिध्द केली. डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघाने १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर इंग्लंड दोन गुणांसह खाली घसरला आहे.

भारतीय संघ गुणांच्या यादीत अव्वल आहे, कारण संघाने इंग्लडविरुद्ध एक सामना जिंकला आहे. तर भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसऱ्या स्थानावर विंडीज संघ आहे. ज्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.

संघाची क्रमवारी गुणांच्या टक्केवारीनुसार ठरते. विजयासाठी १२ गुण, टाय सामन्यासाठी ६ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण आणि पराभवासाठी गुण दिले जात नाही.