जळगाव (प्रतिनिधी) : थकीत पगार न मिळाल्याने  एका एस.टी कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेत  आपली जीवनयात्रा आज (सोमवार) संपवली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावात घडली आहे.  यामुळे जळगावसह एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मनोज चौधरी असे आत्महत्या केलेल्या  एस.टी कंडक्टरचे नांव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.

एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.