कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील फिरत्या लोक अदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या  आदेशानुसार आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा व्ही. व्ही. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांचे सुचनेनुसार ८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२१ पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरते लोक अदालतीलाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी प्रकरणे ४३६ पैकी ४५ निकाली काढण्यात आली. फौजदारी प्रकरणे ३१७ पैकी ४७ निकाली काढण्यात आली. आणि दाखलपूर्व प्रकरणे १०५७ पैकी १९१ निकाली काढण्यात आली होती. असे एकूण १८०९ प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढत ३९ कोटी ४९ लाख ५ हजार ८७४ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. या दरम्यान कोल्हापूर  जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व न्यायिक अधिकारी, कर्मचारी, विधीज्ञ, पक्षकार यांचे सहकार्य लाभले होते.