कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  ‘स्वच्छता अभियान’ या विषयावर शहरस्तरीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत महापालिकेच्या ३५ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेत केले होते. केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी संयोजन केले होते. प्रशासन अधिकारी एस.के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई  यांच्यासह अन्य मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. परिक्षक म्हणून तमेजा मुजावर, शिवशंबू गाटे, विद्या पाटील, आस्मा तांबोळी यांनी काम पाहिले.