कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३१.०३ दलघमी पाणीसाठा आहे. आज (मंगळवार) दुपारी च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील – राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड. भोगावती नदी- खडक कोगे असे एकूण ६ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-231.03, तुळशी -93.10, वारणा -878.16, दूधगंगा – 628.87, कासारी- 61.25, कडवी – 71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी- 63.10, पाटगाव 98.91, चिकोत्रा- 41.10, चित्री – 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.43, घटप्रभा –  41.50,  जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ – 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 16.07 फूट, सुर्वे 18.02, रुई 44.06, इचलकरंजी 41, तेरवाड 39.06, शिरोळ 32 तर नृसिंहवाडी  बंधारा  २९.०९ फूट