कोल्हापूर (प्रतिनिधी) : यावर्षी जिल्ह्यात महापुराने कहर केला होता. याचा फटका कसबा बावड्यातील हजारो कुटुंबाना बसला आहे. मदत नाही तर कर्तव्याच्या भावनेतून कसबा बावड्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेनेच्यावतीने मदत करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. ते कसबा बावडा परिसरात शिवसहाय्य मदतीच्या वाटपावेळी बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर यांना कसबा बावडा परिसरातील महिलांनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.  

यावेळी सकाळी कसबा बावडा येथे राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १०० कुटुंबाना शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या आठवड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कसबा बावड्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना घरोघरी या  शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सामाजिक काम करीत नाही. गेल्या दोन वेळच्या आमदारकीच्या काळाप्रमाणे या दोन वर्षातही कसबा बावडावासियांशी आपले नाते अतूट आहे. कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून, कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता रु. १७ कोटी इतका निधी मंजूर केला आहे. राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोड करिता रु. २५ लाख, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यांमधील रस्त्याची कामे, पाणद्यांचा विकास आदि कामांसाठी आजतागायत रु. २ कोटींच्यावर निधी वितरीत केला आहे. कसबा बावडा स्मशानभूमीची सुधारणा, पाणंद्यांचा विकास, विविध ठिकाणी ओपन जिम, खेळणी, हायमास्ट लँम्प आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

यावर्षीही महापुराचा फटका बावडावासियांना बसला असून, पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला शिवसेना मदत करणार आहे. त्याचबरोबर पुढील काळातही नियोजित कामांद्वारे कसबा बावड्याचा सर्वांगीण विकास करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, विभागप्रमुख रविंद्र माने, राजू काझी, संजय लाड, उदय जाधव, गुरुदास ठोंबरे, राहुल माळी, अक्षय खोत, कपिल पोवार, विनायक बोनगे, सचिन पाटील, सचिन वावरे, दयानंद गुरव, जालिंदर पोवार, आदर्श जाधव, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.