कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन पूर्णपणे संपलेला नाही. जिल्ह्यातील लोकडाऊनची मुदत दि. ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) दिले.  यापूर्वी प्रतिबंधित / बंद क्षेत्र व सूट / वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी / क्षेत्र पूर्ववत सुरू राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.