दिल्ली (वृतसंस्था) : भारतातील  कोरोनाचे संकट आता जवळपास संपत आले आहे. आज ८ व्या दिवशी ३०० पेक्षा कमी कोरोना रुग्णांंची नोंद झाली आहे. काल कोरोनाचे २२६ नवीन रुग्ण आढळले. देशात आतापर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ४ कोटी ४६ लाख ७३ हजार ६१८ झाली आहे, तर आजची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,४३४ झाली आहे.

आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४  तासांत कोरोनाच्या संसर्गामुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ५,३०,६३० झाली आहे. २७ नोव्हेंबर रोजी देशात २९१ कोरोना रुग्ण आढळले. तेव्हापासून सातत्याने दररोज ३०० हून कमी कोरोनाचे नवीन रुग्ण येत आहेत.