मुंबई (प्रतिनिधी) : स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे फोनची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण अशा चुका करतो, ज्या फोन वापरताना देखील लक्षात येत नाही आणि ते तुमच्या स्मार्टफोनसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ज्या गोष्टीने तुमचा फोन खराब होणार नाही किंवा तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे.

स्क्रीनचं ऑन टाइम कमी करा –

फोनची स्क्रीन बराच वेळ अॅक्टिव्ह ठेवल्याने बॅटरी लवकर संपते. त्यासाठी फोनवर  ब्राइटनेस कमी करा.

ऑटो-ब्राइटनेस मोड वापरा –

मोबाइल बॅटरीची लाइफ वाढवण्यासाठी फोनमधील ऑटो-ब्राइटनेस मोड वापरू शकतात. जे प्रकाशानुसार स्क्रीन वरील ब्राइटनेस एडजेस्ट करते. यामुळे फोनच्या बॅटरीचा वापर कमी होतो.

फोन जास्त चार्ज करू नका –

फूल चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच मोबाइल चार्ज करा आणि चार्जिंग पूर्ण झाल्यावर चार्जर काढा.

स्मार्टफोनचे वापर झाल्यावर लगेच करा हे काम –

वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स वापर करून झाल्यावर लगेच बंद करा. फीचर्स बंद केल्याने फोनच्या प्रोसेसरची गती सुधारते.

व्हायब्रेशन मोडचा वापर कमी करा –

तुम्ही जर तुमचा फोन सतत व्हायब्रेशन मोडवर ठेवलात तर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपतेच. त्याचबरोबर बॅटरी लाइफ देखील कमी होते. त्यामुळे गरज असेल, तर फोन व्हायब्रेशन मोडवर ठेवा.