कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उद्या गुरुवार, दि. ७ जुलै रोजी कोल्हापुरात येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले होते.

गेले बारा दिवस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत असून, शिवसेना-भाजप युतीच्या बहुमत चाचणी दरम्यानही ते मुंबईत तळ ठोकून होते. उद्या दि. ७ जुलै रोजी सायं. ५.३० वाजता ते कोल्हापूर येत आहेत. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याची तयारी शिवसैनिक आणि क्षीरसागर समर्थकांनी केली आहे. सायंकाळी ‘शिवालय’ शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.