कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस दमदार पडणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळी बऱ्यापैकी उघडीप दिली होती. हलक्या सरी अधूनमधून कोसळत होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात २२५.५८ दलघमी पाणीसाठा आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी दिवसभरात गगनबावडा ११०.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७३ बंधारे पाण्याखाली आहेत. काही मार्गावरील वाहतूक बंद आहे.

२४  तासांतील पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- ४२ मिमी, शिरोळ -२८.८मिमी, पन्हाळा- ८८.६ मिमी, शाहूवाडी- ८६ मिमी, राधानगरी- ७९.८ मिमी, गगनबावडा- ११०.२ मिमी, करवीर- ५९.३ मिमी, कागल- ४९.३ मिमी, गडहिंग्लज- २२  मिमी, भुदरगड- ५३.५ मिमी, आजरा- ५१.६ मिमी, चंदगड- ६९.२मिमी, असा एकूण ५७.८ मिमी.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगाव, तारळे, खडक कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी, कडवी नदीवरील- सवते सावर्डे, शिरगाव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालूर, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगाव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, हिंडगाव, बिजूरभोगोली व पिळणी, वारणा नदीवरील- मांगलेसावर्डे, चावरे, शिगांव, चिंचोली, कोडोली, तांदूळवाडी व खोची, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकूड, सिध्दनेर्ली व बाचणी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे, मांडुकली, असळज व सांगशी, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, तांम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व कोवाड, धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे, आंबर्डे व गवशी, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी, ऐनापूर, साळगांव व चांदेवाडी, चिकोत्रा नदीवरील- बेळुंखी  असे ७३ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २२५.५८ दलघमी, तुळशी ८४.९६  दलघमी, वारणा ८५१.८८  दलघमी, दूधगंगा ५८४.५१ दलघमी, कासारी ६६.४६ दलघमी, कडवी ७०.३० दलघमी, कुंभी ६६.६२ दलघमी, पाटगाव ९२.४६ दलघमी, चिकोत्रा ३८.७१ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ ३०.९८ जंगमहट्टी, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून चित्री मध्यम प्रकल्प आज पहाटे 5 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ३६.६ फूट, सुर्वे ३४.१० फूट, रुई ६४.२ फूट, इचलकरंजी ५९ फूट, तेरवाड ५० फूट, शिरोळ ४२ फूट, नृसिंहवाडी ३९ फूट, राजापूर २९.११ फूट तर नजीकच्या सांगली १४ फूट व अंकली १८.८ फूट अशी आहे.