मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज (रविवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गटाध्यक्ष मेळावा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावकरांवर वक्तव्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. यावेळी राज ठाकरे यांनी राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत, अशी टीका केली.

तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर राज ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडत, ‘राज्यपाल तुम्ही गुजराती आणि मारवडींना विचारा, तुम्ही महाराष्ट्रात का आले आहात ? तुम्हाला तुमचं राज्य नव्हतं का ? असा सवाल  केला.

तर हिंदुत्वच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाना साधत एकनाथ शिंदेंनी, एका रात्रीत काय कांडी फिरवली आणि सत्तांतर घडवलं. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का ? उद्धव ठाकरे यांना फक्त यांना सत्ता हवी असल्याचे टिकास्त्र राज ठाकरे सोडले.