रांगोळी (प्रतिनिधी) :  भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत संपूर्ण देशातून ३ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या नेमबाजीत प्रांजलीने ६०० पैकी ५८८ गुण मिळवून स्पर्धा उत्तीर्ण होऊन पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळवला.

स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सरावासाठी रायफलचे लायसन व १ हजार गोळ्यांचा (काडतुसे) परवाना मिळाला.  तसेच राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली. मुलींना योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन आणि वडिलांची खंबीर साथ मिळाली की मुलीसुद्धा संधीचं सोनं करतात आणि आपल्या कुटुंबाचं गावाचं नाव उज्ज्वल करतात.  कु. प्रांजली हिने राष्ट्रीय नेमबाजीत १० वा क्रमांक पटकावून कोल्हापूर जिल्हा आणि चंदेरीनगरीचे नाव उज्ज्वल केले. या तिच्या कामगिरीबद्दल तिच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.