नाशिक (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञानवादी होते. गाय उपयुक्त पशू असून तिचा लाभ घ्या, असे त्यांचे मत होते. सावरकर यांचे लिखाण अजरामर झाले असून त्यांचे व्यक्तिमत्व  आगळेवेगळे होते. स्वातंत्र्यसाठीचे त्यांचे योगदान अतुलनीय होते. त्यामुळेच त्यांच्या बाबतीत वाद होणे दुर्दैवी आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी  आपल्या भाषणात सावरकरांची स्तुती केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, साहित्यनगरीला सावरकरांचे नांव न दिल्यावरून भाजपने टीका केली होती. हा संदर्भ घेऊन विज्ञानवादी सावरकरांबाबत वाद होणं चुकीचं असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. सावरकरांच्या त्यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही,  असे पवार म्हणाले.