कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले आहे. मराठा समाजाची आक्रमक भूमिका पाहून राज्य सरकारने यासाठी पावले उचलली आहेत. सरकारकडून आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्झर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.