कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. तर राज्यात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून लसीचा साठ संपल्याने काही जिल्ह्यातील लसीकरण बंद झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करावा, अन्यथा येत्या काही दिवसांत पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला घेराव घालून राज्याबाहेर जाणाऱ्या लसीच्या गाड्या अडवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.