मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या अॅग्रो कंपनीची चौकशी होणार आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड दिल्याचा आरोप भाजपाने केला होता. सहकारमंत्री अतुल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सहकार मंत्र्यांकडून रितेश-जेनेलिया यांना पत्र पाठवण्यात आले आहे. भाजपने कार्यालयाला एक पत्र दिले होते. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच दोघांना याप्रकरणी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. रितेश-जेनेलिया यांना चौकशी आदेश दिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे असल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत काही क्षणात पोहोचते. आता रितेश आणि जेनेलिया वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.