कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री ११.४३ वाजता धरणाचा ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला.  धरणातून २१२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १४ फूट ७ इंचावर आहे. तर राधानगरी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरल्याने आणि वारंवार पडत असलेल्या पावसामुळे यंदा धरणाचे स्वयंचलित दरवाजे आठव्यांदा खुले झाले आहेत.  सध्या जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.