कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री ११.४३ वाजता धरणाचा ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. धरणातून २१२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १४ फूट ७ इंचावर आहे. तर राधानगरी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरल्याने आणि वारंवार पडत असलेल्या पावसामुळे यंदा धरणाचे स्वयंचलित दरवाजे आठव्यांदा खुले झाले आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.
लोकशाही संपवणारे उन्मादी सरकार उलथवून टाका : शरद पवार
by
Adeditor18
April 19, 2024
चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…
by
Adeditor18
April 19, 2024