गारगोटी (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील विश्वास दत्तू पावले (वय ५४) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. जानबा सुभाना धुमाळ (रा. झुलपेवाडी) यांनी आपल्या शेताच्या भोवतीने तारेचे कुंपण करून त्याला विजेचा पुरवठा केला होता. यावेळी विश्वास पावले यांच्या हाताचा स्पर्श या तारेला झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद शिवाजी दत्तू पावले यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलिसांनी जानबा धुमाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
ताज्या बातम्या
सभासदांचा कौल मान्य : प्रसाद पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आम्ही एका वैचारिक भूमिकेतून लढत दिली. सभासदांच्या आर्थिक नुकसानीविरोधात आणि सभासद हितासाठी आम्ही केलेला संघर्ष, बँक वाचवण्यासाठी दिलेला लढा व आमचे संघटनात्मक कार्य सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही...
जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, दोन बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून दमदार पावसास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गासह सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा...
आम्ही बंड नाही तर उठाव केला : गुलाबराव पाटील
मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा...
पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा नेते पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सुबराव गवळी तालीम प्रॅक्टिस क्लब आणि शिवगिरी मित्र मंडळ शिवसेना शाखा खोलखंडोबा यांच्या वतीने पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते कोल्हापुरी थाळी येथे गरजूंना भोजन वाटप...
लोकशाहीत मालक बदलले की निर्णय बदलतात : संजय राऊत
मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द केली. यावर 'ज्याच्या हाती ससा तो पारधी', अशी टीका करून संजय राऊत...