पुणे (प्रतिनिधी) : सामना आणि त्यांचे संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदलले आहेत. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी हे त्यांचे केंद्रबिंदू आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज (शनिवार) येथे आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकारची भूमिका ही लोकशाही विरुद्ध आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या वतीने कोणतेही प्रयत्न होत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व प्रयत्न केले. मात्र, तरीही सरकारने त्यांच्या बाजूने दोन पावले समोर यायला हवे, ते सरकारकडून होत नाही. सरकारकडे संवेदना नाहीत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असेही फडणवीस म्हणाले.