मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने राज्यात वीकएंड लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून १ ली ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील आठवड्यात घेतला होता. आता ९ वी आणि ११ च्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द करण्यात आली असून त्यांना अनुक्रमे दहावी व बारावीत थेट प्रवेश देण्याचा निर्णय आज (बुधवार) सरकारने घेतला. यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा मात्र ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.