कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ४२ नागरीकांकडून १६ हजार, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4 नागरीकांकडून ४ हजार, सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या ४ नागरीकांकडून ४ हजार व सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या २ आस्थापनांकडून १५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या सात भरारी पथकामार्फत शहरात कारवाई करुन ४२ नागरीकांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मीपुरी परिसर, गंगावेश, रंकाळावेश, उतरेश्वर, लक्षतिर्थ वसाहत, महाद्वार रोड, शिवाजी  पेठ, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, खासबाग, जवाहरनगर, उद्दयमनगर, प्रतिभानगर, शाहुनगर, राजारामपुरी परिसर, शाहुपुरी परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेन्द्रनगर, सायबर  चौक, मार्कट यार्ड, रुईकर कॉलनी, कदमवाडी, सदर बाजार, कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई  पार्क, नागाळा पार्क, एसटीस्टॅण्ड परिसर, रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.

अग्निशमन विभागाच्यावतीने शहरातील मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन, मोठी दुकाने येथे दैनंदिन तपासणी करण्यात येत आहे.  गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या पथकामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच केएमटीमधील प्रवाशांची दोन डोस पुर्ण असलेची तपासणी करण्यात येत आहे.  शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्क व सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.