मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कारवाई सुरु आहे. आज (मंगळवार) मुंबईत दहिसर चेकनाका इथून एका गाडीतून २४ किलो काश्मिरी चरस जप्त केलं आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलं असून यात २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर चेकनाका इथे सापळा रचून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे दर महिन्याला काश्मिरला जात होते. तसेच ते दर महिन्याला २५ ते ३० किलो चरस काश्मिरहून मुंबईला आणत होते. यातील मुख्य आरोपीचं नाव बंडू उदमशिळे असं असून त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. बंडू उदमशिळे याला याआधी २०१० मध्येही अटक करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १४ कोटी ४४ लाख इतकी किंमत असल्याचं सांगितलं जात आहे.