मुंबई (प्रतिनिधी) : सध्या पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनेक तरुणांनी सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने या भरतीमध्ये अर्ज केले आहेत. या पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील १८ हजार पदांसाठी मंगळवापर्यंत १२,५००० लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

मुंबईत सात हजार पदांसाठी चार लाख २९ हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर एवढी मोठी भरती आल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. प्रत्येक पदासाठी सरासरी ६७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यातच भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना शिंदे फडणवीस सरकारने ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.