मुंबई (प्रतिनिधी) : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) विधिमंडळात २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत करीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा विकासाला चालना देणारा सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

ना. मुश्रीफ यांनी सांगितले की, मागील वर्षभराच्या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात महसुली तूट असतानाही विकासाला चालना देणारा सर्वोत्कृष्ट असा हा अर्थसंकल्प आहे. महिला, कष्टकरी, शेतकरी, श्रमिक, सुशिक्षित बेरोजगार अशा सर्वच समाजघटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सर्वच देव-देवतानाही न्याय दिला आहे. अनंत संकटांवर मात करीत असतानाच “महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही” या महाविकास आघाडीच्या गतिशील कारभाराची प्रचिती देणारा हा सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प आहे.