टोप (प्रतिनिधी) :  उत्तरप्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, टोप, संभापुर, कासारवाडी गावामध्ये कोणत्याही प्रकारचा बंद पाळण्यात आला नाही. तसेच अंबप फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेस पक्षातर्फे रास्तारोको करण्यात आला.