कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी पत्रकार चंद्रकांत पाटील (दै. पुण्यनगरी) आणि विकास कांबळे (दै. पुढारी) यांना शुक्रवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते.