कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुक्त सैनिक वसाहत, लिशा हॉटेल, युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीमनगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा. अशा सूचना आ. जयश्री जाधव यांनी पालिकेच्या बैठकीत केल्या.

आ. जयश्री जाधव म्हणाल्या की, पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली होती. तेंव्हा पावसाचे पाणी या भागात साचून राहणार नाही. तसेच पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना दिली होती. मात्र, त्यानंतर ही प्रशासनाकडून योग्य काम झाले नसल्याचे दिसून आले आहे. तर मुसळधार पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहील्याची तक्रार नागरिकांच्याकडून होत आहे. हे सांडपाणी का साचून राहत आहे याचा शोध घ्यावा. त्याचे निर्गतीकरण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याची त्वरित अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी डॉ. बलकवडे यांनी, पावसाचे पाणी साचून राहणार नाही आणि नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. याबाबत महापालिका प्रशासन त्वरित कारवाई करेल असे आश्वासन दिले.

यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, आरोग्याधिकारी विजय पाटील, इस्टेट विभागाचे सचिन जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सचिन घोरपडे, स्वप्निल कांबळे, आप्पा कांबळे, सुशील कालगे, उदय  फाळके, डी. एम. कोठावळे आदी उपस्थित होते.