पंढरपूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणाचा विषय हा मुख्यत्वे राज्य सरकारचा आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन गरज असेल तर घटना देखील बदलण्याचा अभ्यास करू, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. लवकरच राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पंढरपूर येथे बोलत होते.

खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी सरकारने जोर लावावा. आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत द्यावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितेले.