मुंबई (प्रतिनिधी) : बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावतच्या विधानाचे समर्थन केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे. शाहरुखचं नव्हे तर बॉलिवूड मधील कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही. मी माझ्या बापाचं नाव लावतो. आर्यन खान हा अत्यंत फालतू विषय होता. असे गोखले यांनी म्हटले आहे.

आपल्या पंच्याहत्तरीनिमित्ताने विक्रम गोखले यांनी देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्याबाबत जे चालू आहे, ते क्षुल्लक आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुळातच माझ्या जन्मदिनी ड्रग्ज या विषयावर प्रश्न का विचारण्यात आला ? हेच समजत नाही.  २१ वर्षांचा मुलगा बॉर्डरवर उभा राहून दहशतवाद्यांना गोळी घालून मारतो, तो माझा नायक आहे. शाहरुख, आर्यन नाही, असे त्यांनी म्हटले आहे.