राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील वाघवडे येथे गवत आणि पिंजराच्या गंजीला आज (शुक्रवार) आग लागली. डोंगरात मळीच्य्या शेतात रघुनाथ एकशिंगे यांचा गोठा आहे. त्याच्या समोरच त्यांनी पावसाळ्यासाठी म्हणून दहा हजार गवताच्या आणि पिंजर्‍याच्या दोन गंज्या रचल्या होत्या. आज दुपारी एकच्या सुमारास आग लागून सर्व वैरण जळून गेली आहे.

त्या गंजी शेजारीच जनावरांचा गोठा आहे. सुदैवाने तो आगीपासून दूर राहिला अन्यथा दहा ते बारा जनावरे असणाऱ्या जनावरांची जीवितहानी झाली असती. दरम्यान, भोगवती कारखान्याच्या अग्निशामन दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणली. या शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.