कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळचे वैभव हे उत्पादक, कर्मचारी, वितरक व ग्राहक या चार स्तंभावर उभे आहे. या सर्वांच्या प्रामाणिक कामामुळे या वैभवामध्ये आणखीन भर पडत आहे, असे गौरवोद्गार संघाचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी काढले. गोकुळच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वर्षभरामध्ये संघाच्या विविध विभागामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कामगारांचा गुणवंत कामगार म्हणून सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच ‘गोकुळश्री’ स्पर्धेतील विजेते ३ म्हैस स्पर्धक व ३ गाय स्पर्धक यांचा सपत्नीक सत्कार केला. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर व कोकण येथील जास्तीत-जास्त दूध वितरण करणाऱ्या वितरकांचा सन्मान संघाचे चेअरमन रविंद्र आपटे व सर्व संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जेष्ठ संचालक अरूण नरके, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी.डी.धुंदरे, उदय पाटील, आमदार राजेश पाटील, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्यजीत पाटील, विलास कांबळे, संचालिका अनुराधा पाटील, बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, शशिकांत पाटील-चुयेकर आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एम.पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी आभार मानले.