कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत बँकेत आणि कार्यालयात येणाऱ्या एक किंवा दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या ताराराणी प्राधान्य कार्ड धारक ग्राहकांना कोणत्याही रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देऊन सेवा दिली जाईल, याची नोंद घ्यावी, असा फलक आपल्या कार्यालयात आणि बँकेत लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी व सन्मान देण्यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून राबविली जात आहे. या योजनेंतर्गत मागील ५ वर्षातील एक आणि दोन मुलींनंतर कुटूंब शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना आणि मुलींना सन्मानीत करण्यासाठी प्राधान्य कार्ड देण्यात आले असून त्यांना रांगेमध्ये न थांबवता त्यांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.