कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शंकरराव कृष्णात माळी (वय ८० रा. राजारामपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (शनिवार) निधन झाले. शंकराव माळी हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे गेले सत्तावीस वर्ष सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या जाण्याने जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,एक मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.