कागल  (प्रतिनिधी) :  छ. शाहू सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, कागल पोलीस स्टेशन, महामार्ग पोलिस आणि छ. शाहू साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वाहतूक विभागाच्या पोलीस निरिक्षक स्नेहा गिरी म्हणाल्या, सध्या साखर हंगाम सुरू असल्याने ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रॅक्टर या वाहनांवर सर्वच वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी रिफ्लेक्टर बसवावेत. वाहनधारकांनी वाहन चालवताना आपली सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस निरिक्षक चंद्रकांत शेडगे म्हणाले,  सर्व वाहनाच्या मालकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे. कारखान्याकडून उपलब्ध करून दिलेले रिप्लेक्टरचा सर्वांनी लाभ घ्यावा. कागल पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय गोर्ले म्हणाले, चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवले तर आपोआप अपघातावर नियंत्रण राहील आणि अपघातमुक्त हंगाम संपन्न होईल.

यावेळी शेती आधिकारी रमेश गंगाई, ऊस विकास आधिकारी के. बी. पाटील, तोडणी वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक के. अे. घराळ, पोलीस निरिक्षक अनिल पाटील, कविता नाईक, आर. आर. गायकवाड, विक्रम जरग, सुनिल गोरे आदी  उपस्थित होते.