इचलकरंजी (प्रतिनिधी) :  पंचगंगा नदीला पुर आल्याने इचलकरंजी येथे पूरस्थिती गंभीर झाली होती. टाकवडेवेस आणि पी. बी. पाटील मळा येथील ६० कुटूंबे गेली सहा ते सात दिवस शांतींनाथ विद्या मंदीर येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. आज (गुरुवार) श्री गुरुदेव भ्रमरंभ मालिकार्जुन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येथील स्थलांतरित पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप ट्रस्टचे अध्यक्ष योगानंद स्वामी, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, नितीन कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले.