कोल्हापूर (प्रतिनिधी) : होळीचे औचित्य साधून राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर शहरामधील विविध गरजू लोकांना पोळ्या वाटण्यात आल्या. तसेच एक घर एक पोळी दान स्वरूपात द्यावी, असे आवाहन जगताप यांनी केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून परिसरातील प्रत्येक घरामध्ये एक पोळी देण्यात आली.  

कोल्हापूर शहरातील रेल्वे स्टेशन, सीबीएस स्टँड परिसर, भवानी मंडप अशा विविध ठिकाणी जाऊन गरजू लोकांना पोळ्या वाटण्यात आल्या. यावेळी परिसरातील तसेच परिसराच्या बाहेर राहणाऱ्या लोकांनी देखील  पोळी स्वरुपात मदत केली.

यावेळी तानाजी सुतार, मिलिंद रायजाधव, सुजित सुतार, तेजस जिरगे, रणजीत जगताप, कल्पक चिले, स्वयंभू आडनाईक, सिद्धांत सरनाईक, अधिराज पाठक, आदित्य कुलकर्णी, पवन डाले, पार्थ बोरकर आदी उपस्थित होते.