कोल्हापूर (प्रतिनिधी) : बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रसार होत असल्याने शहर आणि जिल्हयातील चिकन, मटण सेंटर चालकांनी रोज निर्जंतूकीकरण करावे, बाधीत भागातील कोंबड्या आणू नयेत. अशा सूचना जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.I

डॉ. पठाण म्हणाले की, विविध राज्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी विशेष काळजी घ्यावी. मयत झालेल्या पक्षांची माहिती पशूसंवर्धन अधिकाऱ्याला द्यावे. कोंबडयाचे मांस आणि अंडी शिजवून खाल्याने या आजाराची लागण मनुष्यास होत नाही. तरीही मटण विक्रेत्यांनी काळजी घ्यावी. मटण विक्रेत्यांनी पक्षांचे पिसे आणि त्वचा उघड्यावर टाकू नयेत. तसेच संशयीत पक्षांची विक्री पूर्णपणे थांबवावी, अशा सुचना त्यांनी केल्या.