Published October 15, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये २३४.१६ दलघमी पाणीसाठा आहे. आज (गुरुवार) सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १४००, कोयना धरणातून ३४, २११ तर अलमट्टी धरणातून १,११,२७९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे असे सात बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात १०४.६१ टीएमसी तर अलमट्टी धरणात १२१.९५७ टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा (दलघमी. मध्ये) – : तुळशी – ९८.२९, वारणा – ९७४.१९, दूधगंगा – ७१९.१२, कासारी- ७८.५६, कडवी – ७१.२४,  कुंभी – ७६.८६, पाटगाव – १०५.२४, चिकोत्रा – ४३.१२, चित्री – ५३.४१, जंगमहट्टी – ३४.६५, घटप्रभा – ४४.१७, जांबरे – २३.२३, कोदे (ल. पा.) – ६.०६

बंधाऱ्यांची पाणीपातळी (फुटांमध्ये) – : राजाराम – १७.३, सुर्वे – १८.१०, रुई – ४६, इचलकरंजी – ४४, तेरवाड – ४०.६, शिरोळ – ३५, नृसिंहवाडी – ३६.६, राजापूर – २४.६

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023